मुखपृष्ठ :

मुखपृष्ठ :
एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणार्‍या तान्ह्या मुला

डॉ.श्रीकृष्ण राऊत यांच्या मराठी कविता

डॉ.श्रीकृष्ण राऊत हे समकालीन मराठी कवितेतलं एक महत्त्वाचं हस्ताक्षर.प्रयोगशीलता हा त्यांचा प्रतिभाधर्म.आशयसूत्रे आणि आकृतिबंध अशा दोन्ही अंतर्बाह्य अंगांनी अभिनव होऊन प्रकटणारी त्यांची कविता बहुरूपिणी आहे.कधी ती गझलसारख्या शास्त्रधाटीत रमते,कधी अभंग-लोकगीतांच्या अनघड लयीत लकेरी घेत लोकधाटीत विहरते;तर कधी छंदमुक्त होऊन लीलया दीर्घ पल्ला गाठते.‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणार्‍या तान्ह्या मुला’ हा त्यांचा गाजलेला कवितासंग्रह.

नवीन ब्लॉग : *शिक्षण महर्षी,कृषिरत्न डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख*

नवीन ब्लॉग : *शिक्षण महर्षी,कृषिरत्न डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख* *स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री,भारत कृषक समाज आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती या सारख्या ख्यातनाम संस्थाचे संस्थापक अध्यक्ष, शिक्षण महर्षी,कृषिरत्न डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे सर्व जगाला परिचित आहेत.‘बहुजन हिताय’हा त्यांच्या जीवन-कार्याचा मूलमंत्र होता.‘वेद वाङमयातील धर्माचा उगम आणि विकास’ ह्या ग्रंथातील भाऊसाहेबांचे संशोधन भारतीय दैवतशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत मूलगामी स्वरूपाचे आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मा.भाऊसाहेबांच्या चरणी ही नम्र आदरांजली*
|| येथे वाचा ||

गझल / कविता सादरीकरण :

Loading...

एकला चालो रे



आपल्याच
उजव्या हाताला म्हणावं बाप
आणि
डाव्या हाताला माय.
तेच
घेतात आपला चेहरा
त्यांच्या ओंजळीच्या कुशीत;
जगापासून आपली आसवे झाकण्यासाठी.
करतात आपले सांत्वन,
पुसतात अश्रू
बोटाच्या रुमालाने.
हमसून हमसून
घशात अडकलेल्या हुंदक्यासाठी
तेच पेश करतात
थंडगार पाण्याचा प्याला
आणि 
तापलेल्या डोक्याला
थापटून थोपटून तेच करतात शांत;
केसातून त्यांची वत्सल बोटे फिरवीत.

अंगुली-निर्देश करून
तेच होतात आपले सच्चे वाटाडे;
ज्या वाटेवर आपण चालावे बिनधास्त.
प्रवासाच्या प्रारंभी तेच उभे असतात
आपल्या स्वागताला
गुलाबपुष्प घेऊन
कोणत्याही समारंभाशिवाय.
आणि 
प्रवासात तेच काढतात
आपल्या पायात मोडलेले काटे
कोणत्याही विनंतीविना.

एखाद्या लढाईत
दोन-दोन हात करताना
त्यांचे प्रयत्न पडले अपुरे
आणि
पराजित रुळावर
आपले मुंडके झाले धडावेगळे;
तर त्यांनीच घेतलेली असते
आपली मृत्यूपूर्व जबानी
कागदाच्या छोट्याशा चिटो-यावर-
राजीखुशीने केलेल्या आत्महत्येचा
आळ
कुणावरही येऊ नये म्हणून.

स्वार्थाच्या बाजारात
पाण्यापेक्षा पातळ असतं रक्त
आणि विकाऊ असतं
अच्छाअच्छांचं इमान
हे त्यांना चांगलंच असतं ठाऊक;
म्हणून ते करतात दस्तखत
आपल्या मृत्युपत्रावर.

त्यांच्या इतकं जवळचं
नसतंच आपलं कुणी;
आपल्यावतीने तेच उमटवतात
डाव्या अंगठ्याची निशाणी
मानवतेच्या जाहीरनाम्यावर
ज्यात असतं स्पष्ट नमूद :
रेणुहूनही तोकडा
मनुष्यप्राणी
या विराट ब्रह्मांडामध्ये
अगदी एकटा आहे.

शीर्षकानुसार कवितांचा शोध :

शीर्षकानुसार गझलांचा शोध :

शीर्षकानुसार लेखांचा शोध :

`नाथ हा झाला संत महान' हे माझे गीत सुरेश वाडकर / उत्तरा केळकर यांच्या स्वरात ऐकण्यासाठी > क्लिक करा.

‘अनाथांचा नाथ नाथ महादेव’ हा माझा अभंग सुरेश वाडकर यांच्या स्वरात ऐकण्यासाठी > क्लिक करा.